Bookmark

Bookmark this Blog

Saturday, January 30, 2016

महत्वाचे उच्च पदस्थ

महत्वाचे उच्च पदस्थ :

महाराष्ट्र विधान परिषदेचे नवे सभापती/अध्यक्ष बनले - रामराजे नाईक निंबाळकर (फलटण जि. सातारा) (दिनांक 20 मार्च 2015 पासुन) (यांच्यापुर्वी शिवाजीराव देशमुख हे होते)
 
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे नवे प्रवक्ते बनले - विकास स्वरूप (18 एप्रिल 2015 पासुन) (यांच्यापूर्वी सय्यद अकबरोद्दीन होते)
 
महाराष्ट्र विधानसभेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवे गटनेते बनले - आ. जयंत पाटील (इस्लामपूर) (यांच्यापूर्वी आर.आर. पाटील होते.)
 
उप गटनेते आहेत - आ. जयदत्त क्षीरसागर (बीड)
 
भरताचे 20 वे केंद्रीय मुख्य निवडणुक आयुक्त बनले - सय्यद नसिम अहमद झैदी (19 एप्रिल 2015 पासुन) (यांच्यापूर्वी एच.एस.ब्रम्हा होते.)
 
केंद्रीय निवडणुक आयुक्त
अचलकुमार/ए.के. ज्योती
ओ.पी./ओम प्रकाश रावत
मुख्य निवडणुक आयुक्त आणि दोन निवडणुक आयुक्त यांना वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत काम पाहता येते, नंतर निवृत्त होतात.
 
भारताचा राष्ट्रीय निवडणुक आयोग हा त्रिसदस्यीय असून एक मुख्य निवडणुक आयुक्त आणि इतर दोन निवडणुक आयुक्त आहेत.
 
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे/एमपीएससी चे अध्यक्ष - श्री. व्ही.एन.मोरे.
 
युपीएससी/केंद्रीय लोकसेवा आयोगाचे नवे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली - अरविंद सक्सेना, अध्यक्ष = दिपक गुप्ता
 
केंद्र सरकारचे/नवे केंद्रीय मंत्रीमंडल सचिव बनले- पी.के./प्रदीपकुमार सिन्हा (यांच्यापूर्वी अविनाश चंदर होते.)
 
केंद्र सरकारचे/प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दहशतवाद विरोधी सल्लागार बनले - सय्यद आसिफ इब्राहीम
 
केंद्रीय/भारताचे मुख्य माहिती आयुक्त बनले - विजय शर्मा (10 जून 2015 पासुन) (यांच्यापूर्वी सत्यानंद मिश्रा होते)
 
माहिती आयोगात एकूण 10 माहिती आयुक्त कार्यरत असतात परंतु सध्या तीन पदे रिक्त आहेत. सध्या कार्यरत असणारे सात माहिती आयुक्त
वसंत सेठ
यशोवर्धन आझाद
शरद सबरवाल
मंजुळा पराशर
एम.ए.खान युसूफी
सदभूनम श्रीधर आचार्यालू
सुधिर भार्गव
मुख्य माहिती आयुक्ताची नेमणूक राष्ट्रपती करतात तसेच पदाची शपथ राष्ट्रपती देतात.
 
माहिती आयुक्त आणि मुख्य माहिती आयुक्त हे वयाच्या 65 व्या वर्षापर्यंत कार्यरत राहतात.
 
भारताचे/केंद्रीय मुख्य दक्षता आयुक्त बनले - के.व्ही. चौधरी (10 जुन 2015 पासुन) (यांच्यापूर्वी प्रदीप कुमार होते)
 
केंद्रीय दक्षता आयोगात इतर दोन दक्षता आयुक्त असतात. त्यापैकी एक दक्षता आयुक्त नियुक्ती करण्यात आली - टी.एम. भसीन
 
केंद्र सरकारचे विज्ञान सल्लागार - प्रोफेसर सी. एन. आर. राव
 
सीबीआय चे नवे महासंचालक/प्रमुख बनले - अनिलकुमार सिन्हा (3 डिसेंबर 2014 पासुन) (यांच्यापूर्वी रणजीतकुमार सिन्हा हे होते.)
 
भारतीय गुप्त वार्ता विभाग/आयबी/इंटेजिलन्स ब्यूरो चे नवे प्रमुख बनले-दिनेश्वर शर्मा (जानेवारी 2015 पासुन) (यांच्यापूर्वी सईद आसिफ इब्राहीम हे होते.)
 
रॉ/रिसर्च अँड अॅनालेसिस विंग चे नवे महासंचालक/प्रमुख - राजेंद्र खन्ना (31 डिसेंबर 2014 पासुन) (यांच्यापूर्वी आलोक जोशी होते.)
 
रॉ ही भारताची परदेश विषयक गुप्तचर यंत्रणा आहे.    
 
13 व्या महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले - आ. राधाकृष्ण विखे पाटील - काँग्रेस (शिर्डी जि.नगर)
 
महराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते बनले- आ. धनंजय मुंडे- राष्ट्रवादी काँग्रेस (परळी वैजीनाथ, जि.बीड)
 
महाराष्ट्र विधानसभा सभागृहाचे नेते - देवेंद्र फडणवीस
 
विधानसभा सभागृहाचे नेते हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात असा संकेत आहे.
 
महाराष्ट्र विधान परीषदेचे सभागृहनेते - एकनाथ खडसे हे आहेत.
 
सध्या महाराष्ट्र मंत्रीमंडळातील मुख्यमंत्र्यानंतर दुसर्‍या क्रमांकाचे नेते एकनाथ खडसे हे आहेत.
 
13 व्या महाराष्ट्र विधानसभेचे सभापती/अध्यक्ष बनले - आ. हरीभाऊ बागडे (फुलंब्री जि. औरंगाबाद) (12 नोव्हेंबर 2014 पासुन)
 
यांच्यापूर्वी 12 व्या विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील होते.
 
काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील नेते म्हणून निवड करण्यात आली - मल्लिकार्जून खर्गे (कुलबर्गी/गुलबर्गा, कर्नाटक)
 
काँग्रेस पक्षाचे लोकसभेतील उपनेते - कॅप्टन अमरिंदर सिंग (अमृतसर, पंजाब)
 
काँग्रेस लोकसभेतील मुख्य प्रतोद - जोतिरादित्य शिंदे (गुना,मध्यप्रदेश)
 
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते - गुलाम नबी आजाद (जम्मू कश्मीर), राज्यसभेचे उपविरोधी उपक्षनेते - आनंद शर्मा (हरियाणा)
 
लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद अध्याप कोणत्याही काँग्रेस नेत्याला देण्यात आलेले नाही.
 
भारताचे नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार - अजितकुमार डोवल.
 
भारताचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनले - अरविंद गुप्ता
 
भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या सचिव - श्रीमती ओमिता पॉल.
 
महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव - स्वाधिन क्षत्रिय
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माध्यम व्यवस्थापक/सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली - शरत चंदेर
 
राज्यसभा सभागृहाचे उपनेते - अरुण जेटली हे आहेत.
 
लोकसभा व राज्यसभा या दोन्हीही सभागृहाच्या संसदीय पक्षाचे नेतेपद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे
 
भारत सरकारचे प्रतोद - व्यंकय्या नायडू. लोकसभा उप प्रतोद - संतोष गंगवार. राज्यसभेचे उप प्रतोद - प्रकाश जावडेकर.
 
लोकसभेतील भाजपाचे मुख्य प्रतोद - खा. अर्जुन राम मेघवाल.
 
लोकसभेचे सभागृह नेते - पंतप्रधान नरेंद्र मोदी तर उप न्ते - राजनाथसिंग
उच्च पदस्थ भारत -

भारताचे राष्ट्रपती : प्रणव मुखर्जी (प.बंगाल) (25 जुलै 2012 पासुन) 13 वे राष्ट्रपती आहेत.
 
उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती : मोहम्मद हमीद अंसारी (यू.पी)
 
राज्यसभा उपाध्यक्ष : पी.जे./पल्लथ जोसेफ कुरियन (काँग्रेस) (केरळ)
 
16 व्या लोकसभेच्या अध्यक्षा - श्रीमती सुमित्रा महाजन (इंदौर- मध्यप्रदेश)
 
16 व्या लोकसभेचे उपसभापती - थंबी दुराई (करूर - तामिळनाडू)
महाराष्ट्र राज्य उच्च पदस्थ -

महाराष्ट्र राज्यपाल : सी./चेन्नामेनिनी विद्यासागर राव (तेलंगणा) (30 ऑगस्ट 2014 पासुन) (18 वे राज्यपाल)
 
राज्य नियोजन मंडळ अध्यक्ष : मुख्यमंत्री असतात - श्री. देवेंद्र फडणवीस
 
राष्ट्रीय कृषि आयोग अध्यक्ष : डॉ. एम.एस. स्वामीनाथन
 
महाराष्ट्राचे मुख्य निवडणुक अधिकारी - श्री. नितीन गद्रे
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव/प्रिन्सिपल सेक्रेटरी - श्री. नृपेंद्र मिश्रा (27 मे 2014 पासुन)
 
भारताचे नवे अॅटर्नी जनरल/महान्यायवादी बनले - श्री. अॅड. मुकूल रोहतगी (28 मे 2014 पासुन)
 
रोहतगी हे भारताचे 14 वे अॅटर्नी जनरल आहेत.
 
केंद्र सरकारमधील सध्याचे नरेंद्र मोदी यांच्यानंतर दुसर्‍या क्रमांकाचे मंत्री - राजनाथ सिंह.
 
महाराष्ट्र राज्याचे नवे महालेखापाल बनले - श्री सायंतानी जाफा
 
भारतीय स्पर्धा आयोगाचे अध्यक्ष - अशोक चावला
 
महाराष्ट्राचे नवे राज्य निवडणुक आयुक्त - जे एस. सहारिया (5 सप्टेंबर 2014 पासुन) (यांच्यापूर्वी निला सत्यनारायण या होत्या.)
 
राज्य निवडणुक आयुक्त हे घटनात्मक पद असून यांची नियुक्ती राज्यपाल करतात. तसेच पद व गोपनियतेची शपथ राज्यपाल देतात.
 
अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार - सुसान राईस
 
केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून ऑक्टोबर 2014 मध्ये नियुक्ती करण्यात आली - अरविंद सुब्रमण्यम (16 ऑक्टोबर 2014 पासुन) (यांच्यापूर्वी इला पटनायक होत्या).
 
एन.आय.ए./नॅशनल इंटेजिलन्स एजन्सी/राष्ट्रीय तपास संस्था चे प्रमुख/संचालक - शरद कुमार.
 
भारताचे नवे नियंत्रक व महालेखापाल/कॅग - शशिकांत शर्मा

बंगालची फाळणीबद्दल माहिती

बंगालची फाळणी बद्दल माहिती

लॉर्झ कर्झन हा साम्राज्यावादी व स्वसमूह श्रेष्ठत्व सिध्दान्तांचा कट्टर पुरस्कर्ता होता.

1903 सर अ‍ॅन्डयू फ्रेझरने कर्झनचा आदेश मानून फाळणीची योजना तयार केली.

ब्रिटिश सरकारची मान्यता मिळाल्याने मे 1905 मध्ये लंडनच्या स्टॅंर्डट वर्तमानपत्राने प्रथम जाहीर केली.

बिहार व ओरिसा विस्ताराने मोठा प्रदेश असल्याने प्रशासनाच्या सोयीसाठी फाळणी करण्यात आली.

परंतु प्रत्यक्षात तेथील राष्ट्रवादी चळवळ नष्ट करणे आणि हिंदु मुसलमान यांच्यात भेदनीतीचे राजकारण करणे हाच उद्देश बंगालच्या फाळणीचा असावा.

पूर्व बंगाल व आसाम प्रदेश एकत्र आणि पश्चिम बंगालचा प्रदेश असे विभाजन केले.

फाळणी विरोधी बंगालमध्ये वंगभंग आंदोलन सुरु झाले. कोलकत्याच्या टाऊन हॉलमध्ये प्रचंड सभा घेऊन निषेध केला.

सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी दि बंगाली वृत्तपत्रातून आंदोलनाचा इशारा दिला 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस राष्ट्रीय शोक दिन जाहिर करुन याच दिवशी राखी बांधण्याचा कार्यक्रम केला.

गुरुदेव टागोर यांनी हमारा सोनार बंगला हे काव्य रचले वंदे मातरम हे गीत सर्वत्र गायले बंगाली ऐक्याचे प्रतीक म्हणून आनंद मोहन बोस यांनी फेडरेशन हॉल चे भूमिपूजन केले.

फाळणी रद्द होत नाही तोपर्यत लढा चालू ठेवण्या बाबत निर्णय घेतला.

जिल्हे निर्मिती

जिल्हे निर्मिती :

1. 1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)

                      औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)

2. 16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून – लातूर (29 वा जिल्हा),

    26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)

3. 1990 :मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)

4. 1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)

                       अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)

5. 1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)

                     भंडार्‍यापासून – गोंदिया (35 वा जिल्हा)

6.1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून – पालघर (36 वा जिल्हा)

महाराष्ट्राचा भुगोल

महाराष्ट्राचा भूगोल

महाराष्ट्र राज्य:

महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. स्थापनेचा वेळी महाराष्ट्रात 26  जिल्हे, 235 तालुके, 4 प्रशासकीय विभाग होते.

सध्यास्थितीत महाराष्ट्रात 36 जिल्हे, 355 तालुके, 535 शहरे, 43663 खेडी, 6 प्रशासकीय विभाग आहेत.

महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग:

कोकण (30746 चौ.किमी): मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी/सिंधुदुर्ग.

पुणे/प.महाराष्ट्र (57268 चौ.किमी): पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

नाशिक/खान्देश (574426 चौ.किमी): नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार.

औरंगाबाद/मराठवाडा (64822 चौ.किमी): औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद,        लातूर, नांदेड.

अमरावती/प.विदर्भ (46090 चौ.किमी): अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम.

नागपूर/पूर्व.विदर्भ (51336 चौ.किमी): नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.

राज्य व राजधानी

राज्य व त्यांच्या राजधानी :

सीमाआंध्रप्रदेश -  हैदराबाद

अरुणाचलप्रदेश - इटानगर

आसाम - दिसपुर

बिहार - पटणा

छ्त्तीसगढ - रायपूर

गोवा - पणजी

गुजरात - गांधीनगर

हरियाणा - चंदिगड

हिमाचल प्रदेश - सिमला

जम्मू काश्मीर  - श्रीनगर (उन्हाळी) जम्मू (हिवाळी)

झारखंड - रांची

कर्नाटक - बेगलूरू

केरळ - तिरूअनंतपुरम

मध्यप्रदेश - भोपाळ

महाराष्ट्र - मुंबई

मणीपुर - इंफाळ

मेघालय - शिलॉग

मिझोराम - ऐझवाल

नागालँड - कोहिमा

ओडिशा - भुवनेश्वर

पंजाब - चंदिगड

राजस्थान - जयपूर

सिक्किम - गंगटोक

तामिळनाडू - चेन्नई

त्रिपुरा - आगळताळा

उत्तरप्रदेश - लखनौ

उत्तराखंड - डेहराडून

पश्चिम बंगाल - कोलकत्ता

तेलंगणा - हैद्राबाद

विज्ञान विषयातील महत्वाची सुत्रे

विज्ञान विषयातील महत्वाची सूत्रे :

सरासरी चाल = कापलेले एकूण अंतर (s) / लागलेला एकूण वेळ (t)

त्वरण = अंतिम वेग (v) - सुरवातीचा वेग (u) / लागलेला वेळ (t)

बल = वस्तुमान * त्वरण

गतिज ऊर्जा = 1/2mv2

स्थितीज ऊर्जा = mgh

आरशाचे सूत्र = 1/आरशापासून वस्तूचे अंतर(u) + 1/आरशापासून प्रतिमेचे अंतर(v) = 1/नाभीय अंतर (f) = 2/ वक्रता त्रिजा

विशालन (m) = प्रतिमेचा आकार (q) / वस्तूचा आकार (p) = -v/u

सममूल्यभार = रेणूवस्तूमान / आम्लारिधर्मता

प्रसामान्यता (N) = द्रव्याचे ग्रॅम मधील वजन / ग्रॅम सममूल्यभार * लीटरमधील आकारमान

रेणुता (M) = द्रव्याचे ग्रॅम मधील वजन / द्राव्याचे रेणूवस्तूमान * लीटरमधील आकारमान

प्रसामान्यता समीकरण = आम्लद्रावणाची प्रसामान्यता * आकारमान = आम्लरी द्रावणाची प्रसामान्यता * आकारमान

द्राव्याचे एक लीटर मधील वजन = प्रसामान्यता * ग्रॅम सममूल्यभार

माझी कन्या भाग्यश्री आणि दिनदयाळ योजना

माझी कन्या भाग्यश्री योजना-

*राज्यात गत दहा वर्षात मुलीचा जन्मदर घटल्याने मुलीच्या जन्मदर वाढीसाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी 'माझी कन्या भाग्यश्री' ही योजना जाहीर करण्यात आली आहे. 

*या योजनेनुसार एका मुलीवर शस्त्रक्रिया केल्यास मुलीचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी 5 हजार रूपये दिले जाणार.

*तसेच मुलगी 5 वर्षाची होईपर्यंत पोषण आहाराकरीता 10 हजार रूपये पहिली ते पाचवीपर्यंतच्या दर्जेदार शिक्षणासाठी 12 हजार 500 रूपये तर सहावी ते बारावीच्या शिक्षणापोटी 21 हजार रूपये मिळतील. 

*पालकांचा विमा उतरविला जाणार आणि पालकांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास 30 हजार रूपये तर अपघाती मृत्यू झाल्यास 75 हजार रुपये मिळतील.

*मुलीचा 21 हजार रूपयांचा विमा करून 18 वर्ष झाल्यानंतर 1 लाख रु. मिळतील.

* मुलीच्या जन्मदरवाढीसाठी अशा प्रकारचे पाऊल उचल्याबद्दल मुलीचे आजी-आजोबा यांना सोन्याचे नाणे देत गौरवण्यात येणार आहे.

* त्याचबरोबर ज्या गावाने मुलीच्या जन्मदर वाढीसाठी प्रोत्साहन दिले त्या ग्रामपंचायतींना 5 लाख रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे. 

*दोन मुलीवर शस्त्रक्रिया केल्यास वरील सर्व फायदे विभागून दिले जातील. 

----------------------------------

पंडीत दीनदयाळ योजना-

*राज्य शासनाच्या विविध योजनाअंतर्गत देण्यात येणार्‍या घरकुलासाठी जागा खरेदी करता यावा यासाठी राज्य सरकारने पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने योजना सुरू केली आहे.

*या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

*राज्य सरकार व केंद्र सरकार तर्फे अनु. जाती व अनु.जमातीसाठी दारीद्ररेषेखालील बेघरांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी इंदिरा आवास, रमाई घरकुल योजना, शबरी आवास योजना राबविण्यात येते.

*परंतु आता वाढत्या लोकसंख्यामुळे घरासाठी जागा शिल्लक नाही या योजनेअंतर्गत 500 चौ. फुट जागेसाठी 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.

*तसेच मोठ्या ग्रामपंचायती, नागरी भागात दोन मजली किंवा तिन मजली घरे बांधण्यास मुभा देण्यात आली आहे.

बाल न्याय सुधारणा विधेयक

बाल न्याय सुधारणा विधेयक-

*अल्पवयीन गुन्हेगाराचे वय बदलून कठोर शिक्षेची तरतूद असलेले बाल न्याय सुधारणा विधेयक राज्यसभेत 22 डिसेंबर 2015 मध्ये संमत करण्यात आले.

* दिल्लीत 2012 मध्ये झालेल्या अमानवीय निर्भया बलात्कार प्रकरणानंतर संसदेत नव्हे तर समाजातील सर्व स्तरातून केंद्र सरकारवर अल्पवयीन गुन्हेगाराचे वय बदलविण्यासाठी दबाव निर्माण झाला होता.

* या विधेयकाला माकपचे सीताराम येच्युरी त्यांनी आक्षेप घेत सभात्याग केला परंतु सर्व सहमतीने बालगुन्हेगारासाठीची वयोमर्यादा 18 वरून 16 वर्षांपर्यंत कमी करण्याच्या बहुचर्चीत ‘बालगुन्हेगार  न्यायीक -काळजी व संरक्षण विधेयक’ (ज्यूवेनाईल जस्टीस) 2015 लाराज्यसभेने मंजुरी दिली.

* या विधेयकामुळे बालगुन्हेगाराचे वय 18 वरून 16 निश्‍चित करण्यात आले.

* परीणामी गुन्हेगारीच्या संदर्भातील नव्या व्याख्येनुसार 16 ते 18 वयोगटातील मुलामुलींची गणना प्रौढातच केली जाईल. 

*यापूर्वी 1986 मध्ये राजीव गांधी सरकारनेसंसदेत मंजूर केलेल्या देशातील पहिल्या कायद्यात बालगुन्हेगाराचे वय 16 होते मात्र वाजपेयी सरकारने 2000 मध्ये ते 16 वरून 18 वर नेले. 

*निर्भया प्रकरणातील बलात्कारी मुलगा 18 वर्षाचा आतील असल्याने कायद्यानुसार सुटला परिणामी मोदी सरकारने आपल्या पक्षाचा कायदा पुन्हा बदलवून बालगुन्हेगाराचे वय 16 वर आणले.
संकलन.....
ज्ञानेश मेश्राम ��....

दशांश अपुर्णांक

���� दशांश अपूर्णांक��

ज्या अपूर्णांकाचा छेद हा 10 किंवा 10 च्या घातांकात असतो. त्या अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक म्हणतात.

उदाहरणार्थ : 8/10 = 0.8, 3/100 = 0.03

व्यवहारी अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना : प्रथम छेद 10 किंवा 10 च्या घातांकात करा.

उदाहरणार्थ : 2/5 = 2×2/5×2 = 4/10 = 0.4, 3/25 = 3×4/25×4 = 12/100 = 0.12

छेदाच्या 1 वर जेवढे शून्य असतील, तेवढया स्थळानंतर अंशांच्या संख्येत डावीकडे दशांश चिन्ह धा.

उदाहरणार्थ : 5/100 = 0.05, 25/100 = 0.25

दशांश अपूर्णांकांचा गुणाकार करताना :

गुणांकातील एकूण स्थळे मोजून तेवढया स्थळानंतर गुणाकारात डावीकडे दशांश चिन्ह देणे.

उदाहारणार्थ : 15×7 = 105 :: 0.15×0.7 = 0.105 याचप्रमाणे 0.15×0.07 = 0.0105.

दशांश अपूर्णांकांचा भागाकार करताना : भाजकाची जेवढी स्थळे भाज्यापेक्षा जास्त, भागाकारात तेवढे शून्य उजवीकडे देणे.

समाजसुधारक व पदव्या

समाजसुधारक व त्यांच्या पदव्या :

Social Reformers and their Title :

1. जस्टीज ऑफ दि पीस - जगन्नाथ शंकरशेठ
2. मुंबईचा अनभिषिक्त सम्राट - जगन्नाथ शंकरशेठ
3. मुंबईचा शिल्पकार - जगन्नाथ शंकरशेठ
4. आचार्य - बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे
5. घटनेचे शिल्पकार - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
6. मराठीतील पहिले पत्रकार - विनोबा भावे
7. लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख
8. विदर्भाचे भाग्यविधाता - डॉ. पंजाबराव देशमुख
9. समाजक्रांतीचे जनक - महात्मा ज्योतीबा फुले
10. भारतीय प्रबोधनाचे जनक - राजा राममोहन रॉय
11. नव्या युगाचे दूत - राजा राममोहन रॉय
12. आधुनिक भारताचे अग्रदूत - राजा राममोहन रॉय
13. भारतीय पुनरुजीवन वादाचे जनक - राजा राममोहन रॉय
14. हिंदू नेपोलियन - स्वामी विवेकानंद
15. आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते - दादाभाई नौरोजी
16. भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक - न्यायमूर्ती रानडे
17. भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते - दादाभाई नौरोजी
18. पदवीधराजे मुकुटमणी - न्या.म.गो.रानडे
19. नामदार - गोपाळ कृष्णा गोखले
20. हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन - महात्मा ज्योतीबा फुले
21. आधुनिक मनू - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
22. दलितांचा मुक्तीदाता - डॉ. आंबेडकर
23. कर्मवीर - भाऊराव पायगोंडा पाटील
24. आधुनिक भगीरथ - भाऊराव पायगोंडा पाटील
25 महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिग्टन - भाऊराव पायगोंडा
पाटील
26. महर्षी - धोंडे केशव कर्वे / विठ्ठल रामजी शिंदे
27. राष्ट्रसंत - तुकडोजी महाराज
28. हिंदुस्थानच्या कुषक क्रांतीचे जनक - पंजाबराव देशमुख
29. महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचे अद्यप्रवर्तक -
लोकशाहीवादी गोपाळ हरी देशमुख
30. धन्वंतरी - डॉ. भाऊदाजी लाड
31. राजर्षी - शाहू महाराज
32. वस्तीगृहाचे अद्यजनक - शाहू महाराज
33. सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष - शाहू महाराज
34. तेल्या तांबोळ्यांचे पुढारी - लोकमान्य टिळक
35. असंतोषाचे जनक - लोकमान्य टिळक
36. जहाल राजकारणी - लोकमान्य टिळक

जगातिल महत्वाचे नेतृत्व

जगातील महत्वाचे नेतृत्व
जगातील महत्वाचे नेतृत्व:

सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष - टोनी टॅग केंग याम

सिंगापूरचे पंतप्रधान - ली हसेन लुंग

सेशल्स देशाचे राष्ट्राध्यक्ष - जेम्स अॅलेक्स मायकल

दक्षिण कोरिया देशाच्या राष्ट्राध्यक्षा - श्रीमती पार्क गुएन हाई

सुदान चे राष्ट्राध्यक्ष - ओमर हसन अल बाशिद

फिलिपाईन्स देशाचे राष्ट्राध्यक्ष - अॅक्विनो

केनिया देशाचे उपराष्ट्राध्यक्ष - विल्यम रूटो

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष - मैत्रीपाला सिरीसेना (श्रीलंका फ्रिडम पार्टी)

श्रीलंकेचे पंतप्रधान - रनिल विक्रमसिंघे (युनायटेड नॅशनल पार्टी)श्रीलंकेच्या संसदेचे विरोधी पक्षनेते बनले - राजवरोथीयम संपानथन (तामिळ नॅशनल अलायन्स पक्ष)

जर्मनीच्या चान्सलर - श्रीमती अँझेला मर्केल (ख्रिश्चन डेमोक्रेटिक यूनियन पक्ष)

जर्मनीच्ये व्हाईस चॅन्सलर - सिग्मार ग्रॅब्रियल

इटलीचे पंतप्रधान - मॅटेओ रेन्झी

कोलंबिया चे राष्ट्रध्यक्ष - जुआन मान्यूअल सान्तोस

ऑस्ट्रेलियाचे नवे पंतप्रधान बनले - माक्लम टर्नबुल (कॉन्झर्वेटीव्ह पक्ष) (15 सप्टेंबर 2015 पासून) (यांच्या पूर्वी टोनी अबोट होते)

माल्कम टर्नबुल हे ऑस्ट्रेलियाचे 29 वे पंतप्रधान आहेत.ऑस्ट्रेलियाचे गर्व्हर्नर जनरल - पिटर गोस गोव्ह

चिली देशाच्या राष्ट्राध्यक्षा - श्रीमती मिशेल बाचलेट

नेदरलँड/हॉलंड चे राजे - राजे विल्यम अलेक्झांडर

कंबोडियाचे पंतप्रधान - हन सेन

हंगेरी चे राष्ट्राध्यक्ष - व्हीक्टर ओरबान

आयर्लंडचे पंतप्रधान - एंडा केनी

सौदी अरेबियाचे राजे - युवराज खालिद अल फैजल.

जॉर्डनचे राजे - राजे अब्दुल्ला.

मालदिव चे राष्ट्राध्यक्ष - अब्दुल्ला यामीन अब्दुल गय्युम

नेपाळचे नवे पंतप्रधान बनले - के.पी./खडग प्रसाद शर्मा ओली (11 ऑक्टोंबर 2015 पासुन) (यांच्यापूर्वी सुशील कोईराला होते.)

के.पी.शर्मा ओली हे सीपीएन/कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेप

चल वस्तु

चल वस्तु (Moving object)
==============
चल वस्तु :
विस्थापन :
विस्थापन म्हणजे गतीमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदुनमधील सर्वात कमी अंतर होय.
चाल :
एखाद्य वस्तूने एकक वेळात कापलेल्या अंतरास चाल म्हणतात.
चाल = एकूण कापलेले अंतर / एकूण लागलेला वेळ
SI पद्धतीने चाल m/s मध्ये व CGS पद्धतीत cm/s मध्ये मोजतात.
खूप जास्त अंतरासाठी km/hr हे एकक वापरतात.
वेग :
'एखाद्या वस्तूने एकक काळात विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास वेग म्हणतात'.
विस्थापनातील वेळेच्या संदर्भात होणार्‍या बदलाचा दर म्हणजे वेग होय.
वेग = विस्थापन / वेळ
चाल आणि वेग यांची एकके सारखीच असतात.
चाल अंतराशी संबंधित आहे तर वेग विस्थापनाशी संबंधित आहे.
गती सरल रेषेत असेल तर वेग आणि चाल यांचे मूल्य सारखेच असते.
अन्यथा चाल ही गतीपेक्षा अधिक मूल्य असणारी राशी आहे.
एकरेषीय एकसमान व नैकसमान गती:
एकरेषीय एकसमान गती : ज्या गतीमध्ये वस्तु समान कालावधीत समान अंतर कापते तिला एकसमान गती म्हणतात.
नैकसमान गती : ज्या गतीमध्ये वस्तु समान कालावधीत असमान अंतर कापते, तिला नैकसमान गती म्हणतात.
उदा. गर्दीच्या रस्त्यावरून वाहनाची गती.
त्वरण :
वेगामधील वेळेच्या संदर्भात होणार्‍या बदलला त्वरण म्हणतात.
त्वरण = वेग बदल / काल
a = v-u/t
v= अंतिम वेग
u= सुरवातीचा वेग
t= कालावधी
ज्यावेळी गतीच्या सुरवातीला वस्तु विराम अवस्थेत असते त्यावेळी सुरवातीचा वेग u=0
ज्यावेळी गतीच्या आखेरीस वस्तु विराम अवस्थेत येते त्यावेळी अंतिम वेग v=0
गतीविषयक समीकरणे :
1. वेग काळ संबंधी समीकरणे:
v=u+at
2.स्थिती काळ संबंधी समीकरणे :
s = ut+1/2 at2
3. स्थिती वेग संबंधी समीकरणे :
v2 =u2+2as